Rain Update : मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता
डॉ. रामचंद्र साबळे
Rain Prediction : आठवड्याचे सुरवातीस राज्याच्या उत्तर भागावर १००६ तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब बुधवार (ता. ६) पर्यंत राहील. ही स्थिती गुरुवार (ता.७) पर्यंत कायम राहील. या संपूर्ण कालावधीत पूर्व विदर्भात मध्यम, तर उर्वरित महाराष्ट्रात अल्प स्वरूपात पावसाची शक्यता राहील. शुक्रवारी (ता.८) हवेच्या दाबात बदल होण्यास सुरुवात होईल. त्यावेळी उत्तर महाराष्ट्रावर १००४ तर दक्षिण महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. ईशान्येकडील भागावर १००२ हेप्टापास्कल आणि बंगालचे उपसागराच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यावेळी ईशान्य मॉन्सूनच्या पावसास अनुकूल हवामान स्थिती होण्यास सुरुवात होईल.
गोंदिया, धाराशीव, परभणी, बुलडाणा, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा २२ ते २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर सोलापूर, बीड, सातारा, नगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती व हिंगोली या जिल्ह्यांत ३२ ते ३८ टक्के इतका कमी पाऊस सरासरीच्या तुलनेत झाला आहे. सांगली जिल्ह्यात ४६ टक्के व जालना जिल्ह्यात ४९ टक्के इतका सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढ होत असून ते ३१.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. मात्र अरबी समुद्राचे व बंगालचे उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०.५ अंश सेल्सिअस व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे एल निनोचा प्रभाव सुरू आहे.
कोकण ः
आज (ता.३) व उद्या (ता.४) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १ ते १.५ मिमी इतका कमी पाऊस होईल. त्यामुळे नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव संपुष्टात आल्याचे दिसून येईल. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१.५ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६२ ते ६६ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
आज (ता.३) व उद्या (ता.४) नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ०.२ ते ०.४ मिमी इतक्या अल्पशा पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. चारही जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १८ किमी राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत नैऋत्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८० ते ९१ टक्के आणि दुपारची ४४ ते ५५ टक्के राहील.
मराठवाडा ः
आज (ता.३) व उद्या (ता.४) लातूर जिल्ह्यात २२ मिमी पावसाची शक्यता आहे. आज (ता.३) नांदेड जिल्ह्यात ४ मिमी तर उद्या (ता.४) ३१ मिमी पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात आज (ता.३) १५ मिमी पावसाची शक्यता आहे. आज (ता.३) व उद्या (ता.४) धाराशीव जिल्ह्यात ७ मिमी पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात आज (ता.३) २ मिमी व उद्या (ता.४) ११ मिमी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात आज (ता.३) ९ मिमी तर उद्या (ता.४) ५ मिमी पावसाची शक्यता आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज (ता.३) २ ते ३.५ मिमी व उद्या (ता.४)
२ मिमी पावसाची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाड्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ किमी राहील. कमाल तापमान धाराशीव, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस तर नांदेड व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ ः
अमरावती जिल्ह्यात आज (ता.३) ५ मिमी व उद्या (ता.४) ६ मिमी पावसाची शक्यता आहे. आज (ता.३) बुलडाणा जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.४) वाशीम जिल्ह्यात १२ मिमी, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात ३ ते ४ मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १६ किमी राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील.
मध्य विदर्भ ः
आज (ता.३) यवतमाळ जिल्ह्यात २३ मिमी, नागपूर जिल्ह्यात १४ मिमी व वर्धा जिल्ह्यात ९ मिमी तर नागपूर जिल्ह्यात ९ मिमी, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ०.६ ते १.५ मिमी शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ मिमी राहील. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६३ टक्के राहील.
पूर्व विदर्भ ः
आज (ता.३) चंद्रपूर जिल्ह्यात ९.५ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १६ मिमी, भंडारा जिल्ह्यात ६ मिमी व गोंदिया जिल्ह्यात ११ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.४)
चंद्रपूर जिल्ह्यात ११ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १७ मिमी, भंडारा जिल्ह्यात ८.६ मिमी व गोंदिया जिल्ह्यात १२.५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६९ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
आज (ता.३) व उद्या (ता.४) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत १ ते १.७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात नैऋत्येकडून तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २० किमी तर पुणे व नगर जिल्ह्यात १५ ते १७ किमी राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १२ किमी इतका राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ९३ ते ९८ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ७० ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.
कृषी सल्ला ः
- पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिकांना संरक्षित पाणी द्यावे.
- वाढीच्या अवस्थेतील पिकांमध्ये तण नियंत्रण करावे.
- करडई, रब्बी ज्वारी पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
- ज्वारी व करडईसाठी बंदिस्त वाफे तयार करावेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.