प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत आजवर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना २६१६ कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी मंगळवारी ( दिनांक ५ मार्च ) राज्यसभेत ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत राबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यात पश्चिम बंगालचाही समावेश आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
या योजनेचा निधी राज्यनिहाय नव्हे तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी खातरजमा करून दिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार वितरीत करण्यात येत असल्याचं तोमर म्हणाले आहेत.
आजवर पश्चिम बंगालमधल्या ४६ लाख १८९३४ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत २६१६.१४ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यासाठी (Direct Benefit Transfer) थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा वापर करण्यात आल्याचंही तोमर यांनी नमूद केलं आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.