
पुणेः हरियानातील कापूस उत्पादक (Cotton Growers In Haryana) जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांत जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. कपाशी पिकामध्ये पाणी साचले. तसेच पांढऱ्या माशीचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळं कपाशी पिकाचं मोठं (Cotton Crop Damage) नुकसान होत आहे.
हरियानात जोरदार पाऊस होत आहे. शहरांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण आहे. तर शेतशिवरांमध्येही पावसाचं पाणी साचलं. कपाशी पिकांमध्ये पाणी साचल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. हरियानातील सिरसा, फतेहबाद आणि हिसार जिल्ह्यात प्रादुर्भाव जास्त जाणतोय. कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर वाढला. या भागात सलग तिसऱ्या वर्षी कपाशी पीक हातचं जाण्याची वेळ आल्याच शेतकऱ्यांनी सांगितलं.
हरियाना कृषी विभागाने शेतकऱ्यांना कपाशी पिकातील पाणी बाहेर काढण्याचा सल्ला दिला. तर शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर बारीक लक्ष ठेवावं. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागानं दिला. मागील काही दिवसांत पूर्ण कपाशी पिकाचं नुकसान झाल्याचं हिसार जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सांगितलं. या शेतकऱ्यानं कापशीवर फवारणी करणं थांबवलं. कारण पीकात आत जीवच राहीला नाही, कपाशीवर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला, असंही त्या शेतकऱ्यानं सांगितलं.
मागच्या वर्षी गुलाबी बोंड अळीनं पीक उध्वस्त केलं. यंदा पांढरी माशी आणि इतर रोगांमुळं पीक हातचं जातंय. हिसार जिल्ह्यातील काही भागांत तर शेतकऱ्यांना यंदा काहीच हाती लागण्याची शक्यता नाही. नुकसान वाढल्यानं शेतकऱ्यांनी पीक सोडून देण्यास सुरुवात केली. काही भागांत तर कपाशी पिकात तीन फुटांवर पाणी साचलं. या शेतातून पाणी बाहेर काढूनही फायदा नसल्याचं शेतकरी सांगतात.
हरियाना हे कापूस उत्पादनात महत्वाचं राज्य आहे. हरियानात सरासरी १८ ते १९ लाख एकरवर कापसाची लागवड होते. सिरसा, फतेहबाद आणि हिसार ही जिल्हे कापूस उत्पादनात महत्वाची आहेत. मात्र याच जिल्ह्यांत कापसाचं नुकसान जास्त आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.