Wardha News: दिवाळी सणाच्या काळात केळीला नेहमीच चांगला बाजारभाव मिळतो. मात्र, यंदा ऐन सणासुदीच्या काळात केळीच्या भावात घट झाली. बाजारात केवळ ५०० रुपये प्रति क्विंटल दराने केळीची विक्री होत आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत..सेलू तालुक्यात कधीकाळी केळी लागवडीखाली मोठे क्षेत्र होते. त्यामुळेच या भागाला केळीचे हब म्हणून देखील ओळखले जात होते. मात्र त्यानंतर कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, कमी बाजारभाव अशा विविध कारणांमुळे केळीखालील क्षेत्रात मोठी घट झाली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत नामशेष होऊ पाहणाऱ्या केळीच्या बागा पुन्हा उभ्या राहिल्या. बागायतदारांनी आशेने पिकात गुंतवणूक केली; परंतु दर सातत्याने कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Banana Prices: केळीच्या कमी दरामुळे शेतकरी हतबल.दोन वर्षांपूर्वी केळीला २,२५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यानंतर भाव सातत्याने घटले आणि आज ५०० रुपयांवर आले आहेत. रात्रीचे थंड आणि दिवसभर उष्ण वातावरणामुळे केळीचे घड झाडावरच पिकून गेले आहेत. एकाच वेळी सर्व बागांत केळीचे घड कापणीस तयार झाल्याने बाजारात पुरवठा वाढला..Banana Crop Insurance: आंबिया बहरातील केळी पिकासाठी विमा योजना.परिणामी, व्यापाऱ्यांनी खरेदीला नकार दिला आणि भावात घट झाली. शेतकऱ्यांचे घड झाडावरच राहिल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस हंगामातच हातचे गेले. केळीवरच शेवटची आशा होती. पण आता या पिकातही उत्पादन खर्च निघेनासा झाला, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली..शेतकरी आता रब्बी हंगामावर भिस्त ठेवून असून नुकसान भरून काढण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, शासनाकडून कर्जमाफी आणि दरहमीची अपेक्षा वाढत चालली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.