Mahesh Gaikwad
अत्यंत गरीब आणि आज्ञाधारक असणारा परंतु तितकाच दुर्लक्षित राहिलेला प्राणी म्हणजे गाढव.
महाराष्ट्रातील बहुतांशी धोबी, वडार, कुंभार, कैकाडी समजातील लोक प्रामुख्याने गाढव पाळतात. हे लोक आपल्या दैनंदिन रोजीरोटीसाठी गाढवांचा सांभाळ करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
जवळपास पाच हजार वर्षांपासून मानवाने आपल्या दैनंदिन कामासाठी गाढवांचा वापर सुरू केला.
विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात गाढवांचा वापर ओढकाम, वाहतूक, शेती व इतर कष्टांच्या कामासाठी केला जातो.
२०१९ च्या पशुगणनेनुसार भारतात १.२ लाख गाढवांची संख्या आहे. जी २०१२ मधील पशुगणनेच्या तुलनेत ६१.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे.
महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे असून ती २०१२ च्या पशुगणनेच्या तुलनेत ३९.५९ टक्के इतके कमी झाले आहेत.
वाढते यांत्रिकिकरण आणि गाढव पाळणाऱ्या संबंधित समाजात वाढलेल्या साक्षरतेमुळे नोकरी आणि व्यवसायाकडे नवी पिढी वळाली आहे. त्यामुळे गाढवांच्या संख्येत झालेली घटीचे महत्त्वाचे कारण आहे.
गाढव संवर्धनाबाबत आज कुठेही नेमकी माहिती उपलब्ध नाही. व्यवस्थापन, निवारा, आरोग्य, प्रजनन याविषयी सहज माहिती उपलब्ध होत नाही.
कष्टाळू आणि आज्ञाधारी असलेल्या या प्राण्याने मानव जातीला दिलेल्या योगदानाची आठवण व्हावी, यासाठी ८ मे हा जागितक गाढव दिवस म्हणून साजरा केला जातो.