Team Agrowon
शेती क्षेत्रात शेतकरी, उद्योजक, शेतमजूर, अशा विविधांगी भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे.
कामाच्या बाबातीत पुरुषांच्या जोडीने शेतात राबूनही महिलांना त्यांच्याइतका सन्मान दिला जात नाही.
महिलांची कृषिक्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका असून, अन्न व कृषी महामंडळाच्या आकडेवारीनुसार महिलांचे शेतीमध्ये ३२ टक्के, तर कृषीविषयक रोजगारामध्ये ४८ टक्के योगदान आहे.
बऱ्याच देशांमध्ये शेतीमधील महिलांची भूमिका ही केवळ मदत मानली जाते, ही बाब अधोरेखित करावी लागेल.
ती’च्या कष्टाशिवाय शेती अपूर्ण बचत गटांच्या विविध पाहणी अहवालातून स्पष्ट होते, की महिला कर्ज अधिक चांगल्या पद्धतीने फेडतात. विशेषतः ग्रामीण भारतामध्ये, शेतीवर अवलंबून असलेल्या महिलांची टक्केवारी ८४ टक्के इतकी आहे.
महिला सुमारे ३३ टक्के शेतकरी आणि ४७ टक्के शेतमजुरी करतात. असे असूनही दुर्दैवाने महिलांचे हे योगदान काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले किंवा पुरुषप्रधान संस्कृतीने जाणीवपूर्वक तसे ठेवले.
ग्राम जीवनातील स्त्रियांना तर खूपच कष्ट उपसावे लागतात. त्यांच्या कष्टाशिवाय शेती अपूर्णच आहे.