Sanjana Hebbalkar
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी माणसाला पोषक अन्नाचे सेवन करणं गरजेच आहे.
मात्र नुस्ता अन्न खाण गरजेचं नाही तर ते पोषक असणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.
त्यामुळेच आपण दरवर्षी संप्टेबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषक सप्ताह म्हणून साजरा करतो.
पौष्टिक आहाराची महत्त्वाची भूमिका आणि निरोगी खाण्याच्या सवयी जोपासण्याचे महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा आठवडा असतो.
दरवर्षी या आठवड्याची थीम वेगळी असते, युनिसेफच्या मते यावर्षीची थीम "सर्वांसाठी परवडणारा निरोगी आहार" आहे.
अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स ने राष्ट्रीय पोषण सप्ताहाची स्थापना 1975 मध्ये केली होती.
राष्ट्रीय पोषण सप्ताह भारतात 1982 पासून साजरा केला जातो. याचा उद्देश निरोगी पोषण आणि सक्रिय जीवनशैलीच्या अगणित फायद्यांबद्दल जनजागृती करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे.