Anuradha Vipat
आरोग्याच्या दृष्टीने ज्यूस पिण्यापेक्षा 'अख्खी फळे' खाणे अधिक फायदेशीर आहे.
फळांमध्ये मुबलक प्रमाणात डाएटरी फायबर असते. जेव्हा आपण अख्खे फळ चावून खातो, तेव्हा हे फायबर शरीरात जाते. फायबरमुळे पचनशक्ती सुधारते.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. परंतु, फायबर असल्यामुळे ही साखर शरीरात अतिशय हळूहळू शोषली जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही .
आपण एकावेळी जास्तीत जास्त एक किंवा दोन संत्री खाऊ शकतो. कारण फळ खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते.
ताजे फळ खाल्ल्याने त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स जसेच्या तसे शरीराला मिळतात.
ज्यूस काढताना मिक्सरच्या पात्यांच्या उष्णतेमुळे आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे फळांमधील व्हिटॅमिन सी आणि इतर नाजूक पोषक घटक नष्ट होतात.
ज्यूस पिल्याने आपण नकळतपणे खूप जास्त कॅलरीज आणि साखर शरीरात ढकलतो, ज्यामुळे वजन वाढू शकते