Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट राशींच्या लोकांनी, अतिरागीट व्यक्तींनी आणि लोखंड-कोळशाचा व्यवसाय करणाऱ्यांनी सोन्याची अंगठी घालणे टाळावे.
सोने हा गुरू ग्रहाशी संबंधित अत्यंत पवित्र धातू मानला जातो, त्यामुळे तो सर्वांनाच अनुकूल ठरतो असे नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ, मकर आणि तूळ या राशींच्या लोकांसाठी सोने फारसे शुभ मानले जात नाही.
ज्या लोकांना खूप जास्त राग येतो किंवा ज्यांचा स्वतःच्या मनावर ताबा नसतो, त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये.
जे लोक लोखंड, कोळसा किंवा तेलाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांनी सोने घालणे टाळावे.
जर तुमच्या कुंडलीत गुरू ग्रहाची दशा खराब असेल किंवा तो अशुभ स्थानात असेल, तर सोन्याची अंगठी घालणे टाळावे.
शास्त्रानुसार ज्यांना पोटाचे गंभीर आजार आहेत किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे, त्यांनी सोने घालणे टाळावे.