डॉ. सोमिनाथ घोळवे
कांद्याचे भाव ठरविताना शेतकऱ्यांची मेहनत, कष्ट, श्रम, वेळ, केलेली गुंतवणूक इत्यादींना काहीच महत्त्व नसते.
शेतकरी केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित विचार होत नाही. “कांद्या”ला बाजार वस्तू स्वरूपात पाहून, त्याचे मूल्य ठरवले जाते.
कांद्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च (मूल्य) किती आले आहे, याचा विचार होत नाही. हा विचार न होणे हा शेतकऱ्यांवर (उत्पादन करणाऱ्या घटकांवर) फार मोठा अन्याय आहे.
ही अन्यायकारक व्यवस्था तयार करण्यास राजकीय व्यवस्थेचा (केंद्र शासनाचा) पुढाकार आहे, असे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे.
कांदा या शेतमालाचा प्रकिया उद्योग ग्रामीण भागात येणे, पुरेसे मार्गदर्शन, जागृती आणि बाजार विक्री संदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही.
साठ्य-लोट्याचा व्यवहार करून नफा कमवला जातो. शेतकरी पूर्ण नागवला जातो. थोडेही स्वातंत्र्य नसते. पूर्ण थट्टा केली जाते...... हा आजवरचा अनुभव आहे.....