Team Agrowon
पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकात कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. पावसाच्या तिव्रतेनूसार नुकसानीची पातळी ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत आहे.
पावसाच्या तिव्रतेनूसार नुकसानीची पातळी ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत आहे.
ज्या ठिकाणी रब्बी कांद्याची वेळेवर लागवड झाली त्याठिकाणी मार्चच्या मध्यापर्यंत कांद्याची प्रतिएकरी उत्पादकता चांगली दिसत होती, पण पुढे अवकाळीनंतर उत्पादकता कमी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा कांदा रोपे तयार होण्यास उशीर लागला परिणामी जानेवारी महिन्यात लागवडी झाल्या. त्यानंतर अवकाळी पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे मागील कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
कांदा पात करपल्याने कांद्याच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होतो. काही ठिकाणी वेळेवर लागवड झालेल्या कांद्याची काढणी झालेली आहे.
ज्या ठिकाणी उशीरा लागवड झालेली आहे असा कांदा वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे वावरातच आहे.