Team Agrowon
आध्यात्मिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मळ होणे गरजेचे आहे.
यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यात नमामि चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले होते.
पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते.
चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदी काठ स्वच्छ राहावा यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहे.
तसंच सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या अभियानासाठी नदीचा विकास करण्यासाठी तत्काळ आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यामुळे येणाऱ्या काळात चंद्रभागा स्वच्छ राहणार आहे.
आषाढी वारीच्या वेळी राज्यभरातून भाविक पंढरपूरला येत असतात.