Swapnil Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात झालेल्या एका खासगी बसचा अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला
७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर गेल्या या ६ महिन्यांतच ४०० हून अधिक अपघात झाले असून, यात ८० जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरूच असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे.
महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक अपघात डुलकी लागल्याने झाले
त्यानंतर अपघात हे अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.
महामार्गावर दूरपर्यंत काही वेगळे दिसतच नसल्याने चालकाचे मन बधीर होते. त्याला रोड हिप्नोसिस’ म्हणतात.
या महामार्गावर अद्याप विश्रांती थांबे नसल्याने सलग प्रवास करून वाहन चालक थकल्याने अपघात घडले आहेत.
पोलिस चौक्या बांधण्यात न आल्याने अपघातानंतर लगेच मदत मिळत नाही.