Team Agrowon
महाराष्ट्रात खरीप हंगामात तूर हे प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीची पेरणी वेळेवर म्हणजे ३० जूनपर्यंत होणे आवश्यक असते.
पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. चोपण क्षारयुक्त जमीन तुरीला मानवत नाही.
शेवटच्या कुळवणीच्यावेळी हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी.
समाधानकारक पाऊस पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी त्यानंतरच योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी.
लवकर तयार होणाऱ्या वाणांची पेरणी ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी. मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी ६० बाय २० सेंमी. किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर करावी.