Ashadhi Wari : विठुरायांच्या चंद्रभागेत सोडलं उजनीचं पाणी...

Team Agrowon

पावसाची प्रतिक्षा

माॅन्सूनच्या पावसाने जिल्ह्यात अद्याप पाऊस पडला नसल्याने भूजल पातळीत वाढ झालेली नाही. 

३० टक्के पाणीसाठा

सध्या उजनी धरणात मायनस ३० टक्के पाणीसाठा आहे. वारकर्‍यांच्या सोयीसाठी नदीत आणि कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी केली जात होती.

ujani dam | agrowon

आषाढी वारी

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या सोयीसाठी मंगळवार सायंकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

ujani dam | agrowon

सोलापूर जिल्ह्यात पालखी

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवार-रविवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे

ujani dam | agrowon

साडेचार हजार क्युसेक

सकाळी नऊ वाजल्यापासून पंधराशे क्युसेकने पाणी सोडले आहे. दुपारनंतर यात वाढ होणार असून जवळपास साडेचार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.

chandrabhaga | agrowon

आषाढी वारीपर्यंत

आषाढी वारीपर्यंत म्हणजेच २९ जूनपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. पंढरपुरात पाणी पोहोचल्यानंतर मात्र विसर्ग कमी केला जाणार आहे.

chandrabhaga | agrowon

वारकऱ्यांची सोय

यामुळे वारीसाठी आलेल्या भाविकांची व नदीकाठच्या लोकांची सोय होणार आहे.

chandrabhaga | agrowon

तयारी अंतिम टप्प्यात

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील महसूल, जिल्हा परिषद, पेालिस प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

chandrabhaga | agrowon
ajit pawar | agrowon
आणखी पहा
ujani dam | agrowon