Team Agrowon
कोयना धरणात ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 % भरल्यामुळे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता उघडले. धरणातून सध्या ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
लोणावळा, खडकवासला, भीमाशंकर धरण साखळीत आणि उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनीत सध्या ५३.८९ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरणात 94.27 टक्के भरले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरणात ६८.५० टक्के भरले आहे. धरणात १९.९७ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत असल्याने भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवला आहे. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण ८३ टक्के भरले आहे.