Team Agrowon
शेतात कडब्याची कोप तयार करून त्यावर शाल पांघरली जाते. या कोपीमध्ये दगडाचे ५ पांडव बनवले जातात, लक्ष्मी तयार केली जाते व त्यांची पूजा केली जाते.
दिवसभर रानात भटकणे ढाळे, पेरु, ऊस, बोरं इ. रानमेवा चाखण्याचा आनंद घेतला जातो.
विविध रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो.
पुजा करुन आरती झाल्यानंतर बनवलेले अंबिल आणि उंडे एकत्र करून रबी हंगामातील जी पीक आहेत त्यावर शेतभर हे शिंपडलं जातं.
पांढऱ्या चुन्याने मातीचे मडके रंगवून त्यामध्ये कणकेचा दिवा ठेवला जातो. शेतात पीकं चांगली पिकू दे , पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे यासाठी प्रार्थना केली जाते.
मित्र परिवारासह निसर्गरम्य वातावरणात अंबील, उंडे, खीर, गुळशेंगदाण्याच्या पोळ्यां चा आस्वाद घेतला जातो.