Mahesh Gaikwad
गेल्या दोन वर्षांपासून आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावातील शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळेच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम घाटातील नष्ट होत चाललेल्या कोकण कपिला ( कोकण गिड) गोवंश संवर्धनाचे काम सुरू आहे.
दोन वर्षे लॉकडाऊनमुळे वसुबारस साजरी करता आली नाही. पण यंदा तो मुहूर्त साधला गेला.
केवळ आपल्या कुटुंबापुरता हा उत्सव साजरा न करता संपूर्ण आंबा ग्रामस्थांनी वसुबारस साजरी करण्यासाठी घरटी आमंत्रण दिले. कारण अजूनही कोकण कपिला गोवंश शेतकऱ्यांच्या पातळीवर देखील दुर्लक्षित आहे.
यावेळी गोवंशाचे महत्व समजून देण्यासाठी गोशाळेत माहितीपर तक्ते लावले, गोमय आणि गोमूत्रापासून तयार केलेली उत्पादने गावकऱ्यांना दाखविण्यात आली.
वसुबारस ही एक पुरातन भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार गोशाळा शांती पूजन देखील करण्यात आले.
गावातील महिला बचत गटांच्या उपक्रमशील सदस्यांच्या हस्ते गोमाता पूजन झाले.