Anuradha Vipat
राग येणे ही एक नैसर्गिक भावना आहे, पण त्यावर ताबा नसणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि नात्यांसाठी घातक ठरू शकते.
रागावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी खालील सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग अत्यंत प्रभावी ठरतात.
जेव्हा तुम्हाला प्रचंड राग येईल, तेव्हा लगेच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. उलट १ ते १० पर्यंत आकडे मनातल्या मनात मोजा आणि संथ श्वास घ्या.
जर एखाद्या व्यक्तीशी वाद घालताना तुमचा राग अनावर होत असेल, तर तो वाद तिथेच थांबवा आणि काही वेळासाठी त्या खोलीतून किंवा जागेवरून बाहेर पडा.
रागाच्या भरात आपल्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात त्यामुळे काहीही बोलण्याआधी स्वतःला विचारा की, "मी जे बोलणार आहे ते खरोखर गरजेचे आहे का?
शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा रागाच्या स्वरूपात बाहेर पडते. दररोज सकाळी चालणे, धावणे, व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढतात.
तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींचा वारंवार राग येतो यावर शांत डोक्याने विचार करा.