Swapnil Shinde
राज्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाने अभावी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे
यावर राज्यातील शिंदे सरकार कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला
य़ावेळी शेतकऱ्यांची कैफियत एेकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर दिला