sandeep Shirguppe
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने देशभरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु महाराष्ट्रात उत्पादन घटले असल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार आहे.
टोमॅटोचे सर्वाधीक उत्पादन दक्षिणेकडील राज्यात होत आहे. तर सध्या टोमॅटोला ८० ते ९० किलोच्या विकला जात आहे.
दरम्यान भारतातील टोमॅटो पाकिस्तानात निर्यात होत असल्याने मालाला चांगला दर मिळत आहे. यामुळे अनेक राज्याना याचा मोठा फायदा होत आहे.
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा व्यवसाय केला जातो. दरम्यान मागच्या दोन महिन्यात भाजीपाल्यांची लागवड खूपच कमी झाली आहे. यातील टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात झाली.
याचबरोबर राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहेत. यामुळे कित्येक ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने काही प्रमाणात शेती पिकांचे मोठे नुकसान होते याचा परिणाम थेट पालेभाज्यंवर होते यामुळे १५ दिवसांत टोमॅटो ८० रुपयांवर पोहोटला आहे.
दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात टोमॅटोची आयात होत आहे.
भंडारा जिल्ह्यात मागच्या चार दिवसात दिवसाला १० हजार कॅरेट टोमॅटोची गरज भासत आहे. मात्र, पाकिस्तानातील निर्यात वाढल्याने भंडारा जिल्ह्याला केवळ तीन हजार कॅरेट्स पुरवठा होत आहे.
पाकिस्तानात टोमॅटो जात असल्याने आणि पूर्व विदर्भातील मागणी बघता टोमॅटोचे दर प्रति कॅरेट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी एका कॅरेटला ३०० रुपये मोजावे लागत होते, ते आता तब्बल १७०० रुपयांनी वाढले असल्याने प्रति किलोचा दरही १० रुपयांवरून थेट ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांच्या दरातही मोठ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे.