Team Agrowon
मॉन्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं भाजीपाला पिकाला पाणी टंचाईमुळं फटका बसला.
तसेच पिकावरील किड रोगांमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकऱ्यांवर किडनाशकांच्या खर्चाचा भार पडतो.
त्यामुळे एकाच वेळी सिंचन आणि कीटकनाशक खर्चात बचत करणं गरजेचं आहे. यावर मल्चिंग तंत्राचा प्रभावी ठरू शकतं.
विशेषत: मिरची, वांगी, कोबी भाजीपाला पिकांवर मल्चिंग पॉलिथिनचं आच्छादन टाकून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवता येतो.
तसंच पिकांच्या आजूबाजूच्या तणावर नियंत्रण मिळवता येतं.
त्यामुळे किडनाशकांवरील खर्चातही बचत होते. यासाठी १२ ते १५ हजार रुपयांचा खर्च येतो.