Team Agrowon
मे महिन्यात शेतकऱ्यांना अवघ्या ३ ते ५ रुपये किलोने विकाव्या लागलेल्या टोमॅटोच्या भावात मोठी तेजी आली आहे.
टोमॅटोला भाव मिळणारच नाही, असं मानून अनेक भागातील शेतकऱ्यांनी पिकाला खत द्यायचं बंद केलं. यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी होत गेला.
गेले काही आठवड्यांमध्ये महत्वाच्या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये उष्णता जास्त होती. अनेक भागात उष्णतेची लाट होती त्यामुळे भजीपाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला
बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात राज्यांमध्ये टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.
देशभरातील बाजारात टोमॅटोचे घाऊख विक्रीचे दर आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवर पोहचले.दिल्ली आणि बंगळूरु बाजारात टोमॅटो १०० ते १२० रुपयांवर पोहचला.
राज्यातील बाजारात सध्या शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर किरकोळ विक्रीचे भाव ८० ते १०० रुपयांवर पोचले.
भाव टिकण्याचा अंदाज
टोमॅटो भावात झालेली वाढ पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे. पुढील दोन महिने तरी बाजारात तेजी राहील, असे व्यापारी सांगत आहेत.