Team Agrowon
सरकारी नियमांचे तंतोतंत पालन करणारा मच्छीमार बांधव पावसाळी हंगामात घरी बसणार आहे.
बोटी शाकारण्याआधी गलबताच्या साह्याने उदरनिर्वाह होणाऱ्या नौकांची डागडुजी, तसेच मच्छी सुकवणे, साहित्याची स्वच्छता करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील मच्छीमार बांधव व्यग्र झाले आहेत.
त्यांना कुटुंबातील सदस्यदेखील हातभार लावत आहेत. मासेमारी व्यावसायिक, खलाशी, कामगार यांना मासेमारीमुळे हाताला काम मिळते.
बोटीतून प्रवास करताना मच्छीमार बांधव भाजीपाला, मसाले, तांदूळ, पीठ व अन्य वस्तूंची जमवाजमव करून नेतो, तर मासेमारीसाठी लागणारे साहित्य बोटीत ठेवले जाते.
नैसर्गिक आपत्ती, खोल समुद्रात घोंघावणारे वादळ व पाऊस यापासून मच्छीमार सुरक्षित राहावा, म्हणून मत्स्य विभागाने समुद्रात जाण्याची बंदी घातली आहे.
त्यामुळे बोटी माघारी आल्या असून नेलेले साहित्य बोटीतून उतरवत ते टेम्पोच्या साह्याने घरी नेण्यासाठी लगबग सुरू आहे.