Team Agrowon
सरकारने प्रयत्न करूनही टोमॅटोचे भाव तेजीतच आहेत. आजही काही शहरांमध्ये टोमॅटोने २०० रुपयांचा टप्पा पार केला होता.
तर घाऊक बाजारातील भावही काही ठिकाणी १०० रुपयांच्या पुढे पोचला. सरकारने काही भागांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री सुरु केली.
पण त्यामुळे दरवाढीला आधारच मिळाला. पण सध्याच्या स्थितीला सरकारचं धोरणही जबाबदार असल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात.
सरकारच्या नोंदीनुसार टोमॅटो खरिप आणि रब्बी हंगामात घेतला जातो. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बाराही महीने टोमॅटोची लागवड केली जाते.
सरकारच्या मते देशात २०२२-२३ मध्ये जवळपास ९ लाख हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली. तर उत्पादन २०६ लाख टनांवर पोचले.
टोमॅटो पाहीलं तर द्राक्षापेक्षाही संवेदनशील आणि नाशवंत पीक. टोमॅटोच्या खरिपलागवडी आता पूर्ण झाल्या. ७० ते ८० दिवसांमध्ये माल सुरु होतो.