Team Agrowon
अपेक्षित दर नव्हते तेव्हा उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला. त्यामुळे अनेक बाजारपेठा आणि बांधांवर लाल चिखल पाहायला मिळाला.
काही शेतकऱ्यांना १ ते २ रुपये किलो दराने विक्री करावी लागली. मात्र आता शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात तेजी आहे. तर ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार टोमॅटोचे वाढलेल्या दराला आळा घालण्यासाठी सरसावले आहे.
ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल.
या शुक्रवार (ता. १४)पर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ दुकानांच्या माध्यमातून राजधानी दिल्ली क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल.