Anuradha Vipat
उन्हाळ्यात त्वचेवर मुरुमे येण्याचे प्रमाण वाढण्यामागे प्रामुख्याने वातावरणातील बदल आणि शरीरातील उष्णता ही कारणे असतात.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचा जास्त तेलकट होते. जेव्हा हा घाम आणि तेल एकत्र येतात, तेव्हा रोमछिद्रे बंद होतात आणि मुरुमे येतात.
बाहेर फिरताना हवेतील धूळ आणि माती घामामुळे त्वचेला चिकटते. यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते .
शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास त्वचा कोरडी पडते. ज्याचा परिणाम मुरुमांमध्ये होतो.
काही सनस्क्रीन खूप जड किंवा तेलकट असतात. जर ते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नसतील, तर मुरुमे येतात.
उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ किंवा आंबा यांसारख्या उष्ण फळांचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर मुरुमे दिसू लागतात.
उन्हाळ्यात दिवसातून किमान २-३ वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज ३-४ लिटर पाणी प्या.