sandeep Shirguppe
महाराष्ट्राला पश्चिम घाटाचे मोठे सौंदर्य लाभलं आहे. यापैकी माळशेज घाट हा त्यातील उत्तम नमुना आहे. कल्याण-नगर रस्त्यावर असलेल्या या घाटाचा पावसाळ्यात आनंद घेण्याची मजाच वेगळी आहे.
सह्याद्रीच्या कड्याकपारीतून जाताना या हिरव्यागार निसर्गात धबधबे, किरकिर किडे, दुर्मीळ फुले, विदेशी पक्षी दरीतून वर येणारे दाट धुके, या माळशेज घाटात पहायला मिळतात.
माळशेज घाट हा पावसाळ्यातील प्रवाशांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. दरवर्षी माळशेजवरील अनुभूती ही निराळीच ठरते.
मुसळधार पावसामुळे या घाटातील हलकीशी थंडी, आणि फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांना मोहून टाकतात. जणू हाच स्वर्ग आहे, याची, अनुभूती अनुभवायला मिळते.
सिद्धगडावरील धबधबे आणि पर्यटकांना आकर्षित करणारा सुभेदार धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात ट्रेकर्स तसेच पर्यावरण प्रेमींचे सिद्धगड हे प्रसिद्ध असे ठिकाण आहे.
याचबरोबर अनेक तरूण सध्या बाईकने जाणे पसंद करतात. माळशेज घाटानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सिद्धगड हे एक निसर्गाने नटलेले इतिहासकालीन ठिकाण आहे.
मुंबई-ठाणे-कल्याण-मुरबाड- टोकावडे मार्गे खासगी वाहनांनी माळशेज घाट गाठता येते. तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे कल्याणपर्यंत रेल्वेने जाणे आणि तेथून बस अथवा खासगी वाहनांनी माळशेज गाठता येते.
पुण्याहून चाकण-राजगुरूनगर-पेठ -मंचर-नारायणगाव-जुन्नरमार्गे माळशेजला जाता येते. वाहनाऐवजी पायी घाट चढत असताना पर्यटकांना आपल्या आवडीनुसार छोट्या-मोठ्या धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटता येतो.
माळशेज घाट मुंबईपासून १२६ कि.मी. व कल्याणपासून ८५ कि.मी अंतरावर असून पुण्यापासून तो ११८ कि.मी लांब आहे.