Team Agrowon
जून महिला उलटून गेला तरीही अद्याप मराठवाड्यात दमदार पावसाने आगमन झाले नाही.
संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणार जायकवाडीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक थांबलेली आहे.
त्यामुळे सध्यात धरणात केवळ २६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत.
जायकवाडी धरणाच्या पाण्यावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरांची आणि जिल्ह्यातील एमआयडीसीची तहान भागविली जाते.
धरणातील पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
विसर्ग बंद
जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.