Team Agrowon
केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केल्याने आयात स्वस्त झाली.
रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दामुळे सूर्यफुल तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात होते.
नव्या हंगामातील गाळप करण्यासाठी हे साठे कमी करणे गरजेचे होते.
रशिया आणि युक्रेनने हे साठे कमी करण्यासाठी सूर्यफुल तेलाचे दर कमी केल्याने भारतात सूर्यफुल तेलाची विक्रमी आयात झाली.
पामतेल आणि सूर्यफुल तेल स्वस्त झाल्याने सोयाबीन तेलावरही दबाव आला. त्यामुळे सोयाबीन तेलाचीही आयात वाढून खाद्यतेलाचे दर कमी झाले.
सध्या देशात ३५ लाख टन खाद्यतेलाचा साठा आहे. मागील वर्षी याच काळात देशातील साठा १८ लाख टन होता.
सध्या जवळपास दुप्पट स्टाॅक आहे. याचा दबाव देशातील सोयातेलावर आला.