Swarali Pawar
यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य नियोजन गरजेचे आहे. योग्य वाण, बीजप्रक्रिया आणि मशागत केल्यास नुकसान कमी होते.
कमी पाण्यात तग धरणाऱ्या जातींची निवड फायदेशीर ठरते. जेएस-९३०५, जेएस-३३५ आणि फुले दूर्वा या जाती उपयुक्त आहेत.
पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण असेल तर बी योग्य समजावे.
ओल्या कापडात १०० बियाणे ठेवून सावलीत जपून ठेवावीत. ५ ते ७ दिवसांनी किती बियाण्यांना अंकुर फुटले ते तपासावे.
बियाण्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशक प्रक्रिया करावी. यामुळे रोग आणि रसशोषक किडींपासून सुरुवातीचे संरक्षण मिळते.
रायझोबियम आणि पीएसबीची प्रक्रिया खत बचतीस मदत करते. यामुळे पिकाला नत्र आणि स्फुरद अधिक प्रमाणात उपलब्ध होते.
बीबीएफ किंवा सरी-वरंबा पद्धतीने रानबांधणी करावी. यामुळे ओलावा टिकतो आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.
जमिनीत कुजलेले शेणखत मिसळल्यास माती सुपीक राहते. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.