Swarali Pawar
काढणीनंतरही फळे आणि भाज्यांमध्ये पिकण्याच्या प्रक्रिया सुरूच राहतात. म्हणून योग्य साठवण नसेल तर शेतीमाल लवकर खराब होतो.
शीतगृह म्हणजे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवलेली बंद जागा. इथे फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत माल सुरक्षित ठेवला जातो.
कमी तापमानामुळे जंतूंची वाढ कमी होते. यामुळे शेतीमाल अधिक काळ ताजा आणि दर्जेदार राहतो.
शीतगृह उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि नाबार्डकडून अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेतही शीतसाखळी प्रकल्पांना मदत मिळते.
प्रत्येक फळ आणि भाजीसाठी वेगवेगळे तापमान आवश्यक असते. साधारणपणे ३ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात साठवण योग्य ठरते.
शीतगृहाच्या भिंती आणि छप्पर PUF पॅनेलने बनवलेले असतात. यामुळे बाहेरील उष्णता आत येत नाही आणि तापमान स्थिर राहते.
शीतगृहात अमोनिया किंवा फ्रेऑन रेफ्रिजरंट्सचा वापर केला जातो. कॉम्प्रेसर, कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर या यंत्रणेत महत्त्वाचे असतात.
शीतगृहामुळे शेतीमालाची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना माल जास्त काळ विकता येतो त्यामुळे चांगला दर आणि अधिक नफा मिळू शकतो.