Team Agrowon
संत तुकाराम लोकांना आपल्या कीर्तनांमधून उपदेश करीत होते. आपल्या या उपदेशामुळे लोक नाराज तर झाले नाही ना अशी त्यांना शंका आली.
अशा लोकांना उद्देशून हा अभंग लिहिला आहे. ‘बोलिलो जे काही हित उपदेश’ अशी त्यांच्या बोलण्यामागची निखळ लोकहिताची भूमिका होती.
मात्र याचे मर्म न समजता विवेकाची जाण असलेले काही लोक असू शकतील अशी आशंका तुकारामांच्या मनात निर्माण झाली.
आपल्या बोलण्यामागचा हेतू लक्षात घ्यावा आणि राग आला असेल तो बाजूला ठेवून क्षमा करावी अशी विनम्र भूमिका तुकोबारायांनी घेतली आहे
खरं तर आपल्याला आयुष्यात योग्य मार्ग दाखविणारावर रागावू नये असा सुज्ञ व्यक्तींच्या बाबतीत असलेला संकेत आहे.
मात्र हा संकेत झुगारून कुणी आपल्या बोलण्याचा राग धरला असेल आणि उपदेश डावलून आपलाच हेका चालवला तर अशा व्यक्तीचा विनाश अटळ आहे असे समजावे, असे संत तुकाराम म्हणतात.