sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत हा दुष्काळी तालुका आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती साधली आहे.
या तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात एक खिलार जनावर असतचं.
जत शहराच्या दक्षिणेला गंधर्व नदीच्या काठी श्री यल्लमादेवीची मार्गशीष महिन्यात श्री यल्लम्मादेवीची यात्रा भरते.
या यात्रेच्या निमीत्ताने शेतकऱ्यांच्या हितासाठी जनावरे बाजार आणि प्रदर्शन भरवण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
यात्रा तीन दिवस चालते. यामध्ये जनावरांचा मोठा बाजार होतो. या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची जनावरे असतात.
थेट शेतकऱ्यांकडून खरेदी- विक्री केली जाते यामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो, यात शर्यतीचे खोंड, वळू, शेतीकामासाठीचे बैल आदी येत असतात.
पुणे, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, कर्नाटकातील विजापूर, इंडी, जमखंडी, गोकाक, अथणी, विजापूर, बेळगाव येथून पशुपालक येतात.
यामध्ये खोंड- ६० हजार ते एक लाख, शर्यतीचा खोंड- ६ ते ९ लाख, शेतीकामाचे बैल (जोडी)- ३ ते ४ लाख. वळू- ४ ते ५ लाख दर येतो.
१० ते १५ हजार जनावरांची खरेदी विक्री झाली तर तर सुमारे तीन- चार कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला.
शेतीकामाच्या बैलांचे दरही १५ हजारांपासून ६० हजारांनी चढे होते. जातिवंत वळूंचीही चांगली खरेदी झाली.