Team Agrowon
आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.
लाखोंच्या संख्येने वारकरी या दोन्ही पालख्यांमध्ये पायी वारीसाठी सामील झाले आहेत. या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीमध्ये जोरदार स्वागत झाले.
दरम्यान, G-20 परिषदेच्या 'डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट' बैठकीसाठी देश विदेशातील प्रतिनिधी सध्या पुण्यात आले आहेत.
G-20 च्या प्रतिनिधींनाही पालखी सोहळ्यात आपली हजेरी लावत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.
ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे आणि टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महिला प्रतिनिधींनी ठेका धरला. तर पुरष प्रतिनीधींही गळ्यात उपरणे आणि डोक्यावर टोपी घालत विठुच्या नाम गजरात दंग झाले.
ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला.
G-20 च्या प्रतिनिधींना पालखी सोहळ्याचे क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनावर झाला. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पालखी सोहळ्याची छबी कैद केली.