Anuradha Vipat
जेवणात वरून कच्चे मीठ घेणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
अन्न शिजवताना मिठाची रासायनिक रचना बदलते, परंतु वरून घेतलेले कच्चे मीठ शरीराला थेट आणि जास्त प्रमाणात सोडियम पुरवते.
वरून कच्चे मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो.
शरीरात जास्त सोडियम साठल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे किडनी कमकुवत होते.
जास्त प्रमाणात कच्चे मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात.
कच्चे मीठ पोटातील पाचक रसांचे संतुलन बिघडवते. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे आणि छातीत जळजळ होणे अशा समस्या निर्माण होतात.