Team Agrowon
चिखली तालुका व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकवून व्यापारी गाढे बंधू यांनी मोठी फसवणूक केली आहे.
या प्रकरणातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून आज बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही तुपकर यांनी केली.
त्यानंतर चिखली पोलीस स्टेशन येथे गाढे बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
तसेच तातडीने आरोपींना अटक करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिल्याचे तुपकर यांनी सांगितलं आहे.
यावेळी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व त्यांच्या या लढ्यात शेवटपर्यंत मी ताकदीने त्यांच्यासोबत लढत राहील, असा रविकांत तुपकर यांनी शब्द दिला.