Team Agrowon
यंदा देशातील मिरचीचे उत्पादन घटले आहे.
यावर्षीही महाराष्ट्र, तेलंगणासह इतर राज्यात मिरची पिकाचे तुडतुडे किडीमुळे नुकसान झाले.
किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगतात.
एकीकडे उत्पादनात घट झाली आहे, तर दुसरीकडे मिरचीला मागणी वाढली आहे.
यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारातील आवक जरी वाढली, तरही दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.
देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते.