Team Agrowon
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपैकी सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असून, त्या खालोखाल नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, जालना, लातूर व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आधीच्या नुकसानीची भरपाई अजून पदरात पडली नसताना सातत्याने होणारे नैसर्गिक आघात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहेत.
नांदेड येथे अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दिवसभरात नांदेड परिसरातील भागात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
केळी , टरबूज , भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.