Team Agrowon
पावसामुळे शहरात-घरात साप बाहेर येण्याच्या घटना वाढत असतात. यामुळे लोकांच्या जीवाचा धोका आणखी वाढतो
भीतीमय वातावरण
त्यामुळे अनेकदा लोक भीतीच्या छायेखाली वावरत असतात. कोणत्याही क्षणी साप येऊन तुमच्या समोर उभारु शकतो.
आयुर्वेदात अशा वनस्पतीचा उल्लेख आहे, ज्याच्या वासाने साप पळून जातात. त्यामुळे आता भीती वाटण्याचे काही कारण नाही.
पावसात सापांना पळवून लावण्यासाठी सर्पगंधा अतिशय खास मानला जातो. या वनस्पतीचा वास इतका विचित्र आहे की त्याचा वास येताच साप पळून जातात.
मगवॉर्ट
मगवॉर्टची ही वनस्पती बारमाही आहे. या वनस्पतीला खूप सुगंध आहे. ते एक प्रकारचा तण आहे.
सापांना या वनस्पतीचं अस्तित्व अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्याठिकाणी जाण्यास साप टाळतात. मात्र, त्यासाठी या वनस्पतीची खूप काळजी घ्यावी लागते.
गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. पण या गवताच्या वनस्पतीला येणारा वास मात्र सापाला आवडत नाही. अशा परिस्थितीत सापांबरोबरच डासही यापासून दूर पळतात.