Team Agrowon
यंदा कापसाला दहा हजारांहून अधिक दर मिळतील, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती. पण जानेवारी महिन्यापासून कापसाच्या दरात मोठी घसरण झाली.
खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात आवक वाढल्याने किमान दर सहा हजार रुपये तर कमाल दर सात हजार रुपयांहून कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विक्री करणे पसंत केले.
मान्सूनचा पाऊस काही दिवसांवर आल्याने गावागावात खरीप हंगामातील पेरणीसाठीची शेतकऱ्यांकडून लगबग वाढली आहे
खरीप हंगामात मशागतीची कामे झाली असून शेतकरी बाजारामध्ये कापसाचे बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.
पण बाजारामध्ये दर्जेदार बियाणांचा तुटवडा जाणवत असून प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणेच मिळत नसल्याने अडचण वाढली आहे.
शेतकऱ्यांनी ४ पाकिटांची मागणी केली असता केवळ २ पाकिट दिले जात आहेत. त्यांच्यासोबत हलक्या दर्जाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला जात आहे.
यवतमाळमध्ये ८०० रुपये प्रती पॅकेटचे हे वाण १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांत शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिले आहे.
मुळात बियाणे उत्पादनाचे काम दिलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यामुळे कंपन्यांकडे बियाणांचा तुटवडा जाणवत आहे.