Team Agrowon
पावसाळा सुरू झाला की शुद्ध पाण्याची उपलब्धता ही एक समस्या ठरते. कारण सुरवातीच्या काळामध्ये नदी, नाले, तलाव यातील पाणी गढूळ असते. त्यातही लोकवस्तीच्या जमिनीवरून वाहून येताना पावसाचे पाणीही बरेचसे प्रदूषणही घेऊन येते.
शहरामध्ये तरी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी काही योजना असतात. तसेच स्वतःच्या घरी उत्तम फिल्टर बसवणे शक्य असते. मात्र ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक स्थितीमध्ये ते परवडणारे ठरत नाही.
सर्वत्र मुबलक उपलब्ध असलेला शेवगा बिया पाणी शुद्ध करणाऱ्या आहेत.
शेवगा पाण्यातील गाळ खाली बसवत असल्याने तुरटीचेही काम करते.
शेवग्याची पावडर ही पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते.
शेवग्याच्या बियांची एक ग्रॅम पावडर एक लिटर पाणी निर्जंतुक करते.
शेवगा पाण्यातील क्षार (म्हणजेच टीडीएस) कमी करते.