Anuradha Vipat
सूर्यग्रहण सुटल्यानंतर आध्यात्मिक आणि शुद्धीकरणाच्या दृष्टीने काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
आजचे सूर्यग्रहण हे ग्रहण भारतात दिसत नसले, तरी ज्योतिषशास्त्रीय परंपरेनुसार खालील गोष्टी करणे लाभदायक ठरते.
ग्रहण सुटल्यानंतर सर्वात प्रथम स्नान करणे अनिवार्य मानले जाते .असे मानले जाते की स्नानाशिवाय ग्रहणाचे सुत जात नाही .
स्नान केल्यानंतर संपूर्ण घरात आणि देवघरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे.
देवघरातील मूर्तींना शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यांची नवीन पूजा करावी
ग्रहण सुटल्यानंतर केलेले दान हे अनंत पटीने पुण्य देणारे आणि ग्रहणाचे दोष निवारणारे मानले जाते.
ग्रहणापूर्वी तयार केलेले किंवा शिजवलेले अन्न ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये