Team Agrowon
शेतकरी दिवाळीपेक्षाही पीक घरी आणण्याच्या, रब्बी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे.
खरिपाचे पदरात टाकलेली निराशा दिवाळीच्या काळोखात झाकोळली जावी आणि रब्बीने नवी ऊर्जा द्यावी, अशी अपेक्षा बळिराजा बाळगून पुढे निघालेला आहे.
दिवाळीचे पर्व सुरू झाल्याने शहरी भागात घरांची रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट सुरू झाला.
ग्रामीण भागात शेतकरी शेतीमाल घरात आणण्याच्या कामात व्यस्त आहे.
कुठे सोयाबीनची मळणी, तर कुठे कापसाची वेचणी सुरू असल्याचे दिसते.
शेतकऱ्यास घरात शेतीमाल येणे याशिवाय दुसरा मोठा आनंद नसतो..!