Team Agrowon
कॉँग्रेसचे दक्षिण कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील नेहमीच चर्चेत असतात ते त्यांच्या संवदेनशीलतेमुळे.
त्यांच्या मतदारसंघातील सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी आप्पासाहेब चव्हाण यांच्या शेतातील पिकांचं अज्ञातांनी नुकसान केलं.
चव्हाण यांचं हातातोंडाशी आलेल्या टोमॅटो, कारले व मिरची पिकांची नासधूस केली.
तसेच संजय खोत यांच्या शेतातील वरणा पिकाची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केल्याची बातमी समजताच ऋतुराज पाटील यांनी तात्काळ तेथे भेट देऊन माहिती घेतली.
तसेच आर्थिक मदतीचा हात दिला. लांबलेला पाऊस, पाण्याची कमतरता यातून मार्ग काढत शेतकरी पिकांना जीवापाड जपत आहे.
पिकाची समाजकंटकांनी केलेली नासधूस संवेदनशील माणसांच्या डोळ्यात पाणी आणणारी आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया या पाहणी वेळी त्यांनी व्यक्त केली.