Team Agrowon
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.
एफपीओंच्या दहा केंद्रांपैकी काही केंद्रे बाजार समित्यांमध्ये सुरू करण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहेत.
कांद्याच्या कोसळलेल्या दरांवरून राष्ट्रवादीचे नेत छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
नाफेडची खरेदी सुरू झाल्याचे सरकार सांगत आहे, परंतु अद्याप तसे झाले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
सुरू असलेली खरेदी ही व्यापाऱ्यांची असून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून तो नाफेडला विकला जात आहे.
व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू असेल तर या खरेदीचा काय फायदा? नाफेडने जर खरेदी सुरू केली असेल, तर त्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करायला हवा.
‘नाफेड’ने जर बोली लावली तरच व्यापारी त्यावर अधिक बोली लावतील. मुळात नाफेडची खरेदी केंद्रे ही बाजार समित्यांमध्ये असायला हवीत.