sandeep Shirguppe
सध्या दुग्ध आणि कुक्कुट पालन व्यवसायासोबत रेशीम शेती उद्योगाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
रेशीम शेतीला खर्च कमी लागत असल्याने शेतकऱ्यांकडील उपलब्ध साहित्यातून करता येतो. याचबरोबर अत्यल्प कामगारांमध्ये या शेतीचे नियोजन करता येते.
यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. याचबरोबर पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे.
तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते.
तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही.
रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते.
शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
तुतीच्या वाळलेल्या काड्याचा इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.