Anuradha Vipat
आंबा हा फळांचा राजा असला तरी, तो खाताना काही गोष्टींची काळजी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आंबे खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास थंड पाण्यात भिजवून ठेवावेत. भिजवल्यामुळे आंब्यावरील कीटकनाशके आणि रसायनेही स्वच्छ होतात.
आंबा नेहमी सकाळी किंवा दुपारी खाणे उत्तम. रात्री उशिरा आंबा खाणे टाळावे.
आंबा चवीला रसाळ असला तरी तो अतिप्रमाणात खाऊ नये. एका दिवसात एक ते दोन मध्यम आंबे पुरेसे आहेत.
आयुर्वेदानुसार, आंबट फळे आणि दूध यांचे एकत्र सेवन टाळावे.
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा.
ज्या आंब्याचा रंग नैसर्गिक आहे आणि देठापाशी छान सुगंध येतो, असेच आंबे निवडावे