Team Agrowon
सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे न करताच ठेकेदाराला देयके अदा केल्याच्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली आहे.
बेकायदेशीररीत्या कामांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आले आहे.
जलजीवन मिशनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबा कारंडे यांनी केली होती.
काम करणाऱ्या समितीची चौकशी पूर्ण झाली असून, समितीच्या या अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर चर्चेशिवाय बिले अदा करू नये, या अटीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
टेंडर अटीमध्ये ६० टक्के बिल अदा करण्याची अट असताना ८० टक्के बिले अदा केली गेली आहेत.
जलजीवन मिशनच्या कामासाठी भरण्यात आलेल्या निविदा या ठेकेदार आणि अधिकारी यांनी मॅनेज करून भरल्या आहेत.
तसंच ज्या मूळ ठेकेदाराला काम मिळाले आहे. त्याच्याच खात्यावर इतर दोन ठेकेदारांची रक्कम जमा करण्यात आल्याचे यात उघड झाले आहे.