Water Issue : पाणी टंचाई! राज्यात ३ हजार २४६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर...

Swapnil Shinde

माॅन्सूनची प्रतिक्षा

माॅन्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रात राज्यातील अनेक भागात आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. 

water issue | agrowon

पाण्यासाठी भटकंती

मे महिन्यात अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय.

water issue | agrowon

टॅंकरने पाणीपुरवठा

त्यामुळे टंचाईग्रस्त भागात शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

water issue | agrowon

४४८ टँकर

राज्यातील ३ हजार २४६ गावं आणि वाड्यांवर सध्या एकूण ४४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

water issue | agrowon

विदर्भ तहानलेला

राज्यात पाणीटंचाईची सर्वाधिक भीषणता विदर्भात दिसून येत आहे. या विभागातील ९५५ गावात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

जळगावमध्ये सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे

तर राज्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे जळगाव जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात सुमारे ५५६ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

water issue | agrowon

कोकणात मागणी वाढली

राज्यात कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा पाण्याची बरी स्थिती आहे. पण कोकणात पाणी टंचाई तीव्र झाली आहे.

water issue | agrowon

सिंधुदुर्गमध्ये मुबलक पाणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. या जिल्ह्यात एकही गावात पाणी टंचाई जाणवत नाही.

water issue | agrowon
monsoon | agrowon
आणखी पहा